veer dam sakal
पुणे

Pune : वीर धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी सोडणार

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

भोर : नीरा नदीवरील धरणाच्या साखळीतील नीरा-देवघर, भाटघर व गुंजवणी धरण शंभर टक्के भरले असल्यामुळे वीर धरणात येणा-या पाण्याची क्षमता वाढली आहे. त्यामुळे सोमवारी (ता.१३) दुपारी बारा वाजल्यानंतर केंव्हाही वीर धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्केतेचा इशारा देण्यात आला आहे. ९.८३ टीएमसी पाणीक्षमता असलेल्या वीर धरणात सोमवारी सकाळी ९ वाजता ९५.६० टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून ८२७ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परंतु धरणात २१ हजार क्यूसेक्स ने पाणी येत आहे. त्यामुळे १२ वाजेपर्यंत धरणात १०० टक्के पाणीसाठा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे १२ वाजल्यानंतर धरणाच्या दरवाजांमधून आणि डावा व उजवा अशा दोन्ही कालव्यांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यावर्षी २४ जुलैला वीर धरण १०० टक्के् भरले होते. त्यावेळी धरणातून २२ हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे यावेळीही धरणातून तेवढ्याच प्रमाणात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे अशी माहिती जलसंपदा विभागाचे साहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT