veer dam
veer dam sakal
पुणे

Pune : वीर धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी सोडणार

सकाळ वृत्तसेवा

भोर : नीरा नदीवरील धरणाच्या साखळीतील नीरा-देवघर, भाटघर व गुंजवणी धरण शंभर टक्के भरले असल्यामुळे वीर धरणात येणा-या पाण्याची क्षमता वाढली आहे. त्यामुळे सोमवारी (ता.१३) दुपारी बारा वाजल्यानंतर केंव्हाही वीर धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्केतेचा इशारा देण्यात आला आहे. ९.८३ टीएमसी पाणीक्षमता असलेल्या वीर धरणात सोमवारी सकाळी ९ वाजता ९५.६० टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून ८२७ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परंतु धरणात २१ हजार क्यूसेक्स ने पाणी येत आहे. त्यामुळे १२ वाजेपर्यंत धरणात १०० टक्के पाणीसाठा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे १२ वाजल्यानंतर धरणाच्या दरवाजांमधून आणि डावा व उजवा अशा दोन्ही कालव्यांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यावर्षी २४ जुलैला वीर धरण १०० टक्के् भरले होते. त्यावेळी धरणातून २२ हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे यावेळीही धरणातून तेवढ्याच प्रमाणात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे अशी माहिती जलसंपदा विभागाचे साहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT