Custard Apple
Custard Apple sakal
पुणे

Purandar News : सीताफळ हंगामात 40 कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना तोटा

श्रीकृष्ण नेवसे

सासवड, जि. पुणे - पुरंदर तालुका हे सीताफळाचे आगार आहे. परंतु, यंदा उन्हाळा तीव्र होता, त्यामुळे सीताफळाचे सध्याचे जे आगाप (उन्हाळी) बहराचे जे सीताफळ उत्पादन निघत आहे... ते तुलनेत फुलधारणेच्या वेळी असलेल्या तापमानवाढीने परागीभवन कमी राहीले म्हणून उत्पादन कमी आहे. तर सध्या फळाचा आकारही कमी राहीला असून स्थानिक पुरंदर तालुक्यात पाऊस कमी असल्याने फळवाढीला लागाम बसला.

तर बाहेरील भागातील अधिकच्या पावसाने बाजारपेठांचे मार्ग जलमय असल्याने दुसरीकडे सीताफळाचे बाजारभावही तुलनेत पडले आहेत. ऐन सीताफळ हंगामात त्रांगडे होऊन बसल्याची भावना उत्पादकांमध्ये झाली आहे. पुरंदर तालुक्यात आत्तापर्यंत कसेबसे 15 ते 20 कोटी रुपये उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले. मात्र हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यातच 40 कोटी रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना झाला आहे.

मागील काही वर्षे सीताफळ हंगामात पन्नास टक्के माल क्रमांक एकच्या प्रतीचा असायचा. तर दुसऱ्या प्रतीचा माल 30 टक्के आणि तिसऱया प्रतिचा किंवा भुगी प्रकारचा माल 20 टक्के मिळत होता. आता निम्मा माल तिसऱया क्रमांकाचा म्हणजेच भुगी प्रकरातील मिळतोय. क्रमांक एक प्रतीचा माल अगदी 10 ते 15 टक्केच मिळतोय.

बाकी दुसऱ्या क्रमांकाच्या प्रतीचा माल 30 ते 35 टक्के मिळतोय. त्यामुळे सीताफळाचे बाजारभावही 300 ते 1800 रुपये वीस किलोच्या क्रेटमागे जेमतेमच आहेत., असे व्यापारी म्हस्कू खेडेकर, गिरीश काळे, किशोर काळे, सिद्धु खेडेकर, अजित पोमण, निलेश टिळेकर, मनिष सोंडकर, शौकत भाई, विठ्ठल काळे, नितीन काळे आदींनी सांगितले. उत्पादक शेतकरी बाळासाहेब टिळेकर, शंकर झेंडे, रामचंद्र खेडेकर, मुरलीधर झेंडे यांनी.. यानिमित्ताने चांगल्या पावसाच्या व सीताफळ उत्पादन वाढीसह दर सुधारण्याच्या आशा आहेत., असे सांगितले.

पुरंदर तालुक्यातील सीताफळ गणित...

* पुरंदर तालुक्यातील सीताफळ क्षेत्र - 5,500 एकर

* एकरी झाडे 160, तालुक्यात झाडे - 8 लाख 80 हजार

* सरासरी दर 40 ते 60 रुपये किलो, झाडनिहाय उत्पन्न 2.40 लाख रु.

* तालुक्याचे सीताफळ आर्थिक उत्पन्न - 132 कोटी रु. किमान

फळांचा आकार व उत्पादन कमी का.?

* सीताफळात मृग व उन्हाळी (आगाप) बहर धरला जातो

* सीताफळात उन्हाळी (आगाप) बहर धरला, त्यास उन्हाळ्यातील तापमान वाढीने गाठले

* सीताफळात उन्हाळी बहरात तापमानाने आद्रर्ता कमी राहीली

* सीताफळात उन्हाळी बहरात परगीभवन अपेक्षित झाले नाही

* परीणामी उन्हाळी बहरात फुले गळ झाली, फळांची संख्या कमी झाली

* उन्हाळी बहरात जूनच्या पंधराव्यापर्यंत तापमान उच्च राहीले

* फळांची वाढ होण्याला वळवानंतर मॉन्सूनची जोड लाभली नाही

* भूजल कमी पडल्याने सिंचनास अपेक्षित पाणी मिळाले नाही

* उन्हाळी बहरात हा अनैसर्गिक असतो, त्यास तापमान वाढ रोखण्याचे उपया झाले नाहीत

* अजूनही दोन महिने मॉन्सून सरासरीच्या निम्माही झाला नाही

`सीताफळातील फळे दहा टक्के प्रक्रीया उद्योगात जातात. तिथे पल्प (गर) काढला जातो. परंतु पुरंदर तालुक्यात प्रक्रीया उद्योग लहान व मध्यम वीसच्या दरम्यान आहेत. ते एकुण उत्पादनातील 25 टक्के भुगी माल 15 ते 20 रुपये किलो दराने उचलतात. मात्र भुगी माल 40 ते 45 टक्के मिळतोय. त्यामुळे उत्पन्न घटलेय.`

- माऊली मेमाणे, संचालक - राज्य सीताफळ उत्पादक व संशोधन संघ

`सध्या पाऊस कमी असला तरी भिजपाऊस असल्याने सीताफळाच्या मृग बहरास चांगला आहे. आर्द्रता परागीभवनासाठी 80 लागते, ती 95 टक्के आहे. त्यामुळे पुढे फळांचा आकार व उत्पादन वाढेल, असा माझा अंदाज आहे.`

- डाॅ. प्रदीप दळवे, उद्यान विद्या वेत्ता, अंजीर - सीताफळ संशोधन केंद्र, जाधववाडी, ता. पुरंदर

सीताफळांचे विविध ठिकणांचे बाजारभाव...

* सासवड (ता. पुरंदर) घाऊक बाजार - 15 ते 90 रुपये किलो

* पुणे (मार्केडयार्ड) - 15 ते 80 रुपये किलो

* वाशी (नवी मुंबई) मार्केट - 20 ते 80 रुपये किलो

* परप्रांतात - (दिल्ली व इतर) - 40 ते 150 रुपये किलो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT