पुणे

पुण्यात शनिवारी ‘छात्रों की गुंज’ अभियान ‘सावित्रीच्या लेकीं’शी राहुल गांधी साधणार थेट संवाद !

CD

पुणे, ता. १९ ः पेपरफुटी, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता, वाढता शैक्षणिक खर्च, भरती प्रक्रियेतील विलंब, बेरोजगारी अशा विविध प्रश्‍नांसंदर्भात कॉंग्रेस पक्षाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी ‘सावित्रींच्या लेकीं’शी संवाद साधणार आहेत. देशपातळीवरील ‘छात्रों की गुंज’ हे अभियान गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. २२) पुण्यात होणार आहे. त्यामध्ये हजारो विद्यार्थिनी, तरुणींचा सहभाग घेणार असून, राहुल गांधी थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेस पक्षाचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी बुधवारी दिली.
पाटील यांनी बुधवारी ‘सकाळ’ कार्यालयास भेट देत पुण्यातील अभियानाची माहिती देत संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

लोंढे म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी पाच वाजता ‘एआयएसएसपीएमस’च्या मैदानावर होणाऱ्या अभियानात हजारो विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. शहरातील महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व समाजमाध्यमांद्वारे विद्यार्थिनींना या अभियानाशी जोडले आहे. तसेच विविध संस्था, संघटनांद्वारे देखील विद्यार्थिनी सहभागी होतील.’’
-----------
नोंदणीत पुणे देशात अव्वल
युवक कॉंग्रेसकडून देशातील २८ शहरांमध्ये ‘छात्रों की गूंज’ अभियान राबविले जात आहे. राजस्थानमधील कोटा तेथून गांधी यांनी संवाद साधण्यास सुरुवात केली. पुण्यातून २ लाख २६ हजार २१२ इतक्‍या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सूचना नोंदणी केली आहे. देशात सर्वाधिक सूचना पुण्यातून नोंदविल्या आहेत.
-़़------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आई-वडिलांच्या घरात राहून त्यांचाच छळ करता? मुलगा-सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार पालकांना; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

कृषी विभागाचा मोठा निर्णय! आता गावागावांत १५०० रुपये मानधनावरील शेतकरी मित्र; ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव; राज्यात ११,५८७ शेतकरी मित्र नेमले जाणार

Shirur Crime : बेकायदेशीरपणे भिशी, दाम दुप्पट रक्कम करून देण्याचे अमीष; वीस कोटींहून अधिक रकमेचा अपहार, तीन महिलांसह पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल

PM Modi cabinet: मोदींनी सर्वांनाच मागे टाकलं! मंत्रिमंडळ बैठकीत तपासलं मंत्र्यांचं डिजिटल रिपोर्ट कार्ड; 'सोशल मीडिया'वर विशेष लक्ष

आता सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार! ‘या’ वेबसाईटवर करावा लागणार अर्ज; ५० हजारांपेक्षा कमी रकमेसाठी लागणार नाही ‘एफआयआर’, वाचा...

SCROLL FOR NEXT