Rain-Water
Rain-Water 
पुणे

आझादनगर, संग्रामनगरमध्ये साचले पाणी

सकाळवृत्तसेवा

निगडी - गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसाने पालिकेच्या कारभाराच्या मर्यादा उघड झाल्या. सेक्‍टर २२ मधील आझादनगर, संग्रामनगरमधील दीडशेच्या आसपास घरांमध्ये पाणी शिरले. हा परिसर जलमय झाला असून, पालिकेच्या ढिसाळ कारभारविरोधात संग्रामनगरमधील नागरिकांनी भक्ती-शक्ती चौकात सोमवारी (ता. १६) अर्धा तास वाहतूक रोखून धरत संतापाला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. 

संततधार पावसाने महापालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले. संग्रामनगर वस्तीतील घरांमध्ये पाणी शिरले. याबाबत पालिकेकडे अनेकदा पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला; तसेच स्थानिक नगरसेवकांकडेही याप्रकरणी लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितले. घरात पाणी शिरल्याने तारांबळ उडाली. 

घरांमध्ये पाणी शिरले तरीही प्रशासन सुस्त असल्याचे नाराजी राजू गायकवाड यांनी व्यक्त केली.

टपरी हटविल्यावर पाण्याचा निचरा
पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणाऱ्या काही टपऱ्या आणि ओटे आपत्ती व्यवस्थापन विभागाने काढल्याने संग्रामनगरमधील पाण्याचा निचरा झाला आहे. नगरसेवक सचिन चिखले, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, ‘फ’ प्रभागाचे आरोग्य अधिकारी, महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संग्रामनगर, आझादनगर, ओटास्कीम परिसरातील परिस्थितीची पाहणी केली. ज्या टपऱ्या आणि ओट्यामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळा होता, ते जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. त्यानंतर पाण्याचा निचरा झाला.

भोसरीत पुलाखाली तळे साचून दुर्गंधी
भोसरी - येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखाली पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन नसल्याने उड्डाण पुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. रोगजंतूंचाही प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. ही समस्या तातडीने दूर करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. 

भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलावरील पावसाचे पाणी पाइपद्वारे उड्डाण पुलाखाली आणले आहे. मात्र, त्याचा निचरा होण्याचे प्रयोजन नाही. त्यातच उड्डाण पुलाखाली विक्रेत्यांकडून कचराही टाकला जात असल्याने पावसाच्या पाण्यात मिसळून दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेने लवकरात लवकर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT