ajit pawar.jpg
ajit pawar.jpg 
पुणे

वाघोली, उरुळीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्यास मान्यता मिळण्सासाठी पालकमंत्र्यांना साकडे

जनार्दन दांडगे.

उरुळी कांचन (पुणे) : वाघोली व उरुळी कांचन या दोन ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाण्यास तात्काळ मान्यता द्यावी अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, वाघोली व उरुळी कांचन या पूर्व हवेलीमधील दोन्ही शहरांची लोकसंख्या, लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची अपुरी संख्या व या भागातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन, दोन्ही ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाण्याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयात मागिल सहा महिन्यापासून प्रलंबित आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून, उरुळी कांचन व वाघोलीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजुर करावा अशी मागणीही आमदार पवार यांनी आपल्या पत्रात केली आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना आमदार पवार म्हणाले, वाघोलीची लोकसंख्या दिड ते दोन लाखावर पोचली आहे. सध्या वाघोली शहर लोणी कंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. वाघोली हद्दीत ट्रॉफिक जामचा प्रश्न मागिल काही वर्षापासून सतावत आहे. त्यातच लोणी कंद पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी असल्याने, वाघोलीकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या भागातील वाढती लोकसंख्या व वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन, वाघोलीसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव गृहखात्याकडे यापुर्वीच पाठवला आहे. हा प्रस्ताव सध्या पोलिस महासंचालक कार्यालयात मागिल सहा महिन्यापासून प्रलंबित आहे. 

उरुळी कांचन पोलिस ठाण्याबद्दल बोलताना आमदार पवार म्हणाले, उरुळी कांचन शहर सध्या लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत आहे. मात्र, उरुळी कांचन शहराची वाढती लोकसंख्या व या भागातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन, तीन वर्षापूर्वीच उरुळी कांचनसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अपुरी पोलिसांची संख्या लक्षात घेऊन, उरुळी कांचनसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची गरज आहे.

याबाबत बोलताना जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधिक्षक  डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, वाघोली व उरुळी कांचन या दोन मोठ्या शहरांसाठी दोन स्वतंत्र पोलिस ठाणी निर्माण करावीत याबाबतचा प्रस्ताव यापुर्वीच पाठवून दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, वाघोली व उरुळी कांचन परीसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. सध्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने, लोणी काळभोर व लोणी कंदसह जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यात पोलिसांची संख्या अपेक्षापेक्षा खूपच कमी आहे. यामुळे सध्या पोलिसांवर कामाचा ताण अधिक आहे. वरील दोन पोलिस ठाणी निर्माण झाल्यास, वाघोली व उरुळी कांचन परीसरातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT