Sanjay Kakade slams Pankaja Munde in Pune 
पुणे

पंकजा, आता महाराष्ट्रभर फिरून काय दिवे लावणार?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भाजपच्या माजी आमदार पंकजा मुंडे यांनी काल (12 डिसेंबर) भगवानगडावर केलेल्या भाषणात महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे, उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या या निर्णयावर खासदार संजय काकडे यांनी जोरदार टीका केली आहे. 

''पंकजा मुंडे यांनी काल जे वक्तव्य केलं ते भाजपच्या सच्चा कार्यकर्त्याला दुखावणारे आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं, ते कृतीत आणलं नाही. पाच वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्हाला काही कामं करता आली नाही तर महाराष्ट्रात फिरुन तुम्ही काय दिवे लावणार?'' असा सवाल संजय काकडे यांनी केला आहे. 

ते म्हणाले, ''ज्याला आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही, त्यांनी 'मी पक्ष वाढवेल, मी हे करेल, मी ते करेल असे बोलू नये.  गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे मी राज्यसभेवर निवडून आलो. ते पाच वर्षे सगळ्यांना सांभाळायचे. पंकजा मुंडे यांनी मतदारसंघात इतर समाजातील लोकांना त्रास दिला. जातीपातीचे राजकारण केल्याने पंकजा यांचा पराभव झाला. आता मात्र, स्वतःचा पराभव दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न त्या करत आहे. पक्षावर दबाब टाकून स्वतःच्या पदरात काही तरी मिळवण्याची पंकजा यांची नेहमीची सवय आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT