पुणे

केंद्र सरकारचे धोरण शेतकरी हिताचे नाही : शरद पवार

सकाळवृत्तसेवा

पुणे : "कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणि आयातीला पाठिंबा हे केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, असे वाटत नाही," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. पुणे (मांजरी) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे मंगळवारी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले, "राज्यात कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना सध्या समाधानकारक भाव मिळत होता. परंतू केंद्र सरकारच्या व्यापारावरील निर्बंधामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. या संदर्भात नाशिक येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची उद्या चर्चा करणार आहे."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला असताना केवळ आठ ते दहा रुपये किलो रुपये भाव मिळत होता. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नव्हता. चांगला भाव मिळेल या अपेक्षेने कांदा साठवला. थोडाफार शिल्लक राहिलेल्या कांद्याला बाजार समाधानकारक दर मिळत आहे. परंतु नुकसान पाहता शेतकऱ्यांचा हातात काही राहणार नाही, अशी स्थिती आहे. कांदा व्यापारावरील निर्बंधामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या कांद्याच्या प्रश्नावर नाशिक, नगर जिल्ह्यासह विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रायगडमध्ये मतदारांनी मतदानानंतर केलं रक्तदान..

SCROLL FOR NEXT