Sharad Pawar sakal
पुणे

Sharad Pawar : निष्ठा ठेवणाऱ्यांनाच मतदार देणार कौल; मंचरमधील सभेत शरद पवार यांचा दावा

‘सध्या देशात व राज्यात सत्तेवर असलेले राज्यकर्ते सत्तेचा गैरवापर करून ईडी व सीबीआयचा धाक दाखवितात. ‘तुरुंगात जा नाही तर आमच्या पक्षात या’ अशा धमक्या दिल्या जातात.

सकाळ वृत्तसेवा

मंचर (जि. पुणे) - ‘सध्या देशात व राज्यात सत्तेवर असलेले राज्यकर्ते सत्तेचा गैरवापर करून ईडी व सीबीआयचा धाक दाखवितात. ‘तुरुंगात जा नाही तर आमच्या पक्षात या’ अशा धमक्या दिल्या जातात. ‘तुरुंगापेक्षा भाजप बरा’ अशी भूमिका घेऊन काहीजण मी उभारलेल्या पक्षातून बाहेर गेले आहेत.

आंबेगाव, खेड, जुन्नर, बारामती, इंदापूर येथील लोकप्रतिनिधींनी निष्ठा बदलली. त्यांच्यावर मतदारही निष्ठा ठेवणार नाहीत. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत निष्ठा ठेवणाऱ्याच्यांच बाजूने मतदार कौल देतील,’ असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

मंचर (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बुधवारी (ता. २१) जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. कोल्हे यांच्या ‘विकास पर्व’ पुस्तिकेचे प्रकाशन केले.

शरद पवार म्हणाले, ‘शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे म्हणून दहा वर्षे कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना भरभरून दिले. पण, सध्या मात्र देशाचे चित्र भयानक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दररोज जाहिरात वाचतो, ‘मोदी की गॅरंटी’ पण, सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत असून, वेदना भोगत आहे. शेती मालाला हमीभाव नाही.

शेतकरी कर्जामुळे हैराण झाले आहेत. मुलांना नोकऱ्या नाही. शेतकरी, आदिवासी यांच्याविषयी मोदींना आस्था नाही. लोकशाही मार्गाने विरोध करणारे अनिल देशमुख, संजय राऊत यांना तुरुंगात टाकले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप मोदींनी केले. ते भीतीपोटी भाजपमध्ये गेले.’

जयंत पाटील म्हणाले, ‘पवारसाहेबांनी उभा केलेला पक्ष व चिन्ह हिसकावून नेण्याचे काम झाले. पण, आम्ही जर खोलात गेलो तर ४० आमदार अपात्र होतील. पण, आम्ही अद्याप टोकाची भूमिका घेतली नाही. याची नोंद घ्या.’

यशाची खात्री नसल्याने फोडाफोडी

कोल्हापूर : देशात विविध सर्व्हे झाले आहेत. यामध्ये लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला ५० टक्क्यांहून अधिक जागा जिंकण्याचे कल आहेत. भाजपला यशाची खात्री नसल्यानेच त्यांनी अन्य पक्षांत फोडाफोडीचे सत्र सुरू केल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केला.

भाजपने काढलेल्या श्र्वेतपत्रिकेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव आले होते. त्यामुळे ते भाजपमध्ये गेल्याने आश्‍चर्य वाटले नाही. कारण ‘भ्रष्टाचाराचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा’ असे लोक म्हणू लागल्याचे पवार म्हणाले.

आंबेगाव तालुक्यातील माजी आमदार अण्णासाहेब आवटे, माजी आमदार दत्तात्रेय वळसे पाटील, विठ्ठलराव बाणखेले, पी. डी. सैद, म्हातारबा जाधव यांच्या माझ्यावर निष्ठा कायम होत्या. येथील लोकप्रतिनिधीला निष्ठा जपता आली नाही. त्यांना आमदार केले, विधानसभा अध्यक्ष व अनेक मंत्री पदे दिली. देश पातळीवरील साखर महासंघाचे अध्यक्ष केले. त्यांना काय कमी केले? सगळी पदे दिली, पण त्यांनी निष्ठा सोडल्या, याची खंत आहे.

- शरद पवार, ज्येष्ठ नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT