Sharad Pawar
Sharad Pawar  Sakal
पुणे

विजेच्या राष्ट्रीय व्यवस्थापनाची दूरदृष्टी डॉ. आंबेडकरांची

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सध्या महाराष्ट्रात विजेच्या कमतरतेचा प्रश्न आहे. राज्याचे प्रमुख हा प्रश्न सोडविण्यासाठी जास्त वेळ देत आहे. एखाद्या राज्यात निर्माण झालेली अतिरिक्त वीज दुसऱ्या राज्याला देण्यासाठी ‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन’चा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाच आहे, असा दाखला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात दिला. महाराष्ट्रावरील विजेच्या संकटकाळात केंद्र सरकारला हात झटकता येणार नाही, असा सूचक संदेश त्यांनी दिला आहे.

सेनापती बापट रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक डॉ.शां.ब.मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ.विद्या येरवडेकर, संग्रहालयाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर उपस्थित होत्या. राज्याचे विजेचे संकट दूर करण्यासाठी राज्यसरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. डॉ. आंबेडकरांची घटनाकारांच्या पलीकडील कार्याची ओळख त्यांनी करून दिली. ते म्हणाले, ‘‘केवळ घटनाकार एवढीच बाबासाहेबांची ओळख नाही. तर विविधतेने नटलेल्या देशाची संसदीय लोकशाही मजबूत ठेवण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.’’ डॉ. मुजुमदार म्हणाले,‘‘संग्रहालयात केवळ अबोल वस्तू नाहीत. यातील प्रत्येक वस्तूला बाबासाहेबांचा स्पर्श आहे. आजच्या राजकीय वातावरणात अराजकता वाढली असून आपण डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण करायला हवे. आपल्याकडे संविधान, तसेच अन्याय दूर करण्याचे अनेक मार्ग असतानाही असांविधानिक मार्ग स्वीकारू नये.’’ कार्यक्रमात विविध स्पर्धा परीक्षांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या पत्नी माई आंबेडकर यांनी दिलेल्या वस्तूंच्या संग्रहालयाबरोबरच ग्रंथालय आणि लोकशिक्षणाचे विविध उपक्रम या स्मारकात चालविण्यात येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT