IMD Weather Forecast sakal
पुणे

IMD Weather Forecast : उन्हाळा ठरणार अधिक तापदायक ; ‘आयएमडी’कडून एप्रिल ते जून दरम्यानचा हवामान अंदाज जाहीर

यंदाच्या उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : यंदाच्या उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उन्हाळा अधिक तापदायक ठरणार असून तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उन्हाळा हंगामातील (एप्रिल ते जून) तापमानाचा अंदाज सोमवारी हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला. यावेळी पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि अन्न प्रक्रिया विभागाचे मंत्री किरेन रिजिजू, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख कमल किशोर उपस्थित होते.

यंदाच्या उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता अधिक आहे. पूर्व भारत आणि पूर्वोत्तर राज्यांसह वायव्य भारतात मात्र कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान देखील सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता आहे.

दक्षिण द्वीपकल्प, मध्य, पूर्व आणि वायव्य भारतामध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून महिन्यात साधारणतः ८ ते १० उष्ण दिवस असतात. यंदा मात्र सलग १० ते २० उष्ण दिवस अनुभवायला मिळण्याचा इशारा आहे. यात गुजरात. मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशात तीव्र उष्ण लाटांची शक्यता आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या तीव्र ‘एल - निनो’ स्थिती आहे. एप्रिल-मेमध्ये ‘एल - निनो’ स्थिती कायम राहणार असून जूनमध्ये महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सर्वसामान्य पातळीवर येणार आहे.

एप्रिल महिन्यात तीव्र लाट शक्य

एप्रिल महिन्यात राज्यासह देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. यात सलग २ ते ८ दिवस उष्ण राहण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटांचा इशारा आहे.

मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातही उष्ण लाटा अनुभवायला मिळणार आहेत. गुजरात, उत्तर कर्नाटक, ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशातही उष्ण लाटांचा इशारा देण्यात आला आहे. देशात पुढील तीन महिन्यांत तीव्र उष्ण लाटा येऊ शकतात याच काळात निवडणुका होत आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांबरोबरच जागृती आवश्यक आहे.

- किरेन रिजिजू, मंत्री, पृथ्वी विज्ञान मंत्रालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT