Gopal Tiwari Sakal
पुणे

Gopal Tiwari : स्वामी गोविंददेव गिरी यांच्या वक्तव्याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी

देशातील काही मंडळी श्री राम मंदिर नेस्तनाबूत करण्याच्या विचारात आहेत, असे वक्तव्य श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - देशातील काही मंडळी श्री राम मंदिर नेस्तनाबूत करण्याच्या विचारात आहेत, असे वक्तव्य श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी यांनी केली. यामुळे समाजात अविश्वास व असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या वक्तव्याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे.

देशातील सत्ताधाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था सांभाळणे, जनतेस दिलेली आश्वासने पूर्ण करणे, वाढती महागाई, बेरोजगारी, देशावरील वाढते कर्ज, वाढत्या शेतकरी आत्महत्या, घटता विकासदर यावर लक्ष केंद्रित करणे, सामाजिक शांतता राखणे हेच सरकारचे कर्तव्य आहे. पण हे वक्तव्य पाहता देशातील कायदा सुरक्षा पाहता लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम मंदिराचे कार्य व सुरक्षेची जबाबदारी स्वतःच्या अखत्यारीत घ्यावी.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस प्रणीत सरकारांच्या काळात इतर धर्मियांत प्रमाणेच, हिंदू तीर्थ-क्षेत्रांचा ही विकास करून भारतीय संस्कृतीचे रक्षण केले आहे, असेही गोपाळ तिवारी यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar last phone call : अजित पवारांचा अपघातापूर्वी शेवटचा फोन पुतण्याला; ८ वाजून ३७ मिनीटांनी बोललेल्या ऑडिओ क्लिप व्हायरल

Gajabhau X Account: 'गजा भाऊ' अकाउंट डिलीट होणार? देवेंद्र फडणवीसांशी संबंधित प्रकरण काय? महाराष्ट्र पोलिसांची X ला नोटीस

Praful Patel : ‘तो’ निर्णय सुनेत्रा पवारांचा; प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत केले स्पष्ट

Pankaja Munde : राजकारणात बोलताना पथ्य पाळायला हवे

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात दारूची अवैध वाहतूक करवीर पोलिसांनी रोखली

SCROLL FOR NEXT