Pune News
Pune News sakal
पुणे

Pune News : बाजार समितीचा संचालकाला दहा गुंठे जागा; बाजार समितीचा अजब कारभार

प्रवीण डोके @pravindoke007

पुणे : फळ बाजारात समितीकडून शेतमाल १५ फुटाच्या बाहेर लावल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. तर अडते असोसिएशनचे अध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक अनिरुद्ध (बापू) भोसले यांना मात्र विशेष सवलत देत दहा गुंठे जागा शेतमाल उतरवून व्यवसायासाठी दिली आहे. त्यामुळे बाजारात सामान्य अडत्यावर अन्याय होत असल्याचा आरोप अडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांनी पत्रकार परिषदेत बाजार समिती प्रशासनावर केला आहे.

फळ भाजीपाला मुख्य गेट नंबर १ च्या उजव्या हाताला ’थेट शेतकरी ते ग्राहक’ विक्रीसाठी अंदाजे दहा ते पंधरा गुंठे जागा राखून ठेवण्यात आलेली आहे. मात्र बाजार समितीच्या संचालकांना शेतमाल विक्रीसाठी ही जागा उपलब्ध करून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून यायबत बाजारात खमंग चर्चा सुरू आहे. मार्केट यार्डात काही अडत्यांकडे शेतमाल जास्त येतो. त्यामुळे अनेकदा जागे अभावी तो शेतमाल पंधरा फुटांच्या पुढे जातो. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा दावा करत बाजार समिती १८ टक्के जीएसटीसह ५ हजार ९०० रुपयांची दंडात्मक कारवाई करत आहे.

सध्या राज्यभरात अवकाळी पाऊस येत आहे. पावसामुळे मालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी शेतमाल काढून बाजारात आणत आहे. मागच्या दोन तीन दिवसांपूर्वी शेतमाल जास्त झाल्याने कलिंगड आणि चिक्कू उतरवू दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. एका बाजूला बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आहे असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच शेतमालाचे नुकसान केले असल्याचा देखील आरोप काची यांनी केला.

शेतमाल पंधरा फुटाच्या पुढे गेला की वाहतूक कोंडीच्या नावाखाली दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र बाजारात नवीन नवीन टपऱ्या पडत आहेत. पाकळी एकमध्ये भिंतीच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर डमी आहेत. काही पदाधिकाऱ्यांना विशेष सवलत दिली जाते. त्यांच्यावर कोणती कारवाई बाजार समितीने केली हे सांगायला हवे. सामान्य अडत्यांवर कारवाई होत असल्याची भावना अनेकांच्या मनात आहे.

- युवराज काची, माजी उपाध्यक्ष, अडते असोसिएशन.

व्यापारी माल असेल तरच बाजार समिती कारवाई करते. शेतमाल असेल तर कारवाई केली जात नाही. बाजार समितीने कोणत्याही संचालकांना विशेष सवलत दिलेली नाही. तसे कोणी केल्यास कारवाई करण्यास बाजार समिती सक्षम आहे. सदर ठिकाणी माल उतरवला जातो आहे. त्याठिकाणी व्यापार केल्याचे बाजार समितीच्या निदर्शनास आलेले नाही. केलेला आरोप हा चुकीचा आहे़.

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

बाजारात अनेक अडत्यांकडे मोठ्या प्रमाणावर कोकणातून आंबा येत आहे. गाळ्यावर जागा नसल्याने आंबा गेटच्या बाहेरच्या बाजूस खाली केला गेला आहे. आम्ही शेतकऱ्यांचा माल विकत आहोत. मार्केट यार्डात येणाऱ्या शेतमालाला जागा उपलब्ध करून देणे बाजार समितीची जबाबदारी आहे. माल जास्त झाल्यास तात्पुरती अनेकांना जागा दिली जाते. केलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे.

- अनिरुद्ध (बापू) भोसले, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे., अध्यक्ष, अडते असोसिएशन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT