Mobile Sakal
पुणे

शिक्षणासाठी वाढतोय ‘स्मार्टफोन’चा वापर

काही मुलांना शिक्षणासाठी स्मार्टफोनचा पुरेसा वापर करता आला नसल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे गेल्या वर्षी शाळा बंद झाल्या आणि ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. त्यामुळे घरोघरी स्मार्टफोन पोचल्याचे चित्र आहे. ‘असर’ अहवालात विद्यार्थी असणाऱ्या घरांमध्ये स्मार्टफोनच्या संख्येत २०१८ च्या तुलनेत २०२१ मध्ये दुप्पट वाढ झाली. असे असले तरी घरामध्ये स्मार्टफोन असूनही तब्बल २६.१ टक्के विद्यार्थ्यांना तो शिक्षणासाठी उपलब्ध होऊ शकला नसल्याची माहिती समोर आली.

कोरोना काळात मुलांच्या शिक्षणाला ‘ब्रेक’ लागू नये, म्हणून घरोघरी स्मार्टफोन पोचला, परंतु असे असतानाही काही मुलांना शिक्षणासाठी स्मार्टफोनचा पुरेसा वापर करता आला नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रथम फाउंडेशनकडून दरवर्षी शालेयस्तरावरील शैक्षणिक स्थितीची पाहणी केली जाते आणि त्याआधारे ‘असर’ हा अहवाल प्रकाशित केला जातो. २०२१ या वर्षांचा हा अहवाल प्रकाशित झाला. २०१८ मध्ये सरकारी शाळांमधील केवळ २९.६ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्ट फोन होता. आता हीच संख्या २०२० मध्ये ५६. ४ टक्के, तर २०२१ मध्ये ६३.७ टक्क्यांपर्यंत पोचली आहे. देशभरातील ६७.६ टक्के विद्यार्थ्यांकडे घरी किमान एक स्मार्टफोन उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजार कोसळला! 5 लाख कोटींचे नुकसान; मात्र हा शेअर 13% वाढला

Navi Mumbai: मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळणार! ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाच्या कामाला सुरूवात, कसा आहे मार्ग?

Vadgaon Sheri News : बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर; वडगाव शेरी आणि विमानतळ परिसरात पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

Agriculture News : तळवडेत कडक उन्हातही बाजरीचे पीक तरारले, शेतकऱ्यांचा वाढता कल; कमी पाणी अन् खर्चही कमी असल्याचा परिणाम

SCROLL FOR NEXT