katraj.jpg 
पुणे

सर्व अभ्यासक्रमांसाठी हवा एकच नियम कारण...

सकाळवृत्तसेवा

कात्रज (पुणे) : राज्यात वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळे नियम आहेत. ते नियम सर्व शिक्षणांसाठी एकच ठेवावेत. खासगी विद्यापीठांना कुठल्याही प्रकारचे नियम नाहीत. परंतु, शासकिय विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना असंख्य नियम आहेत, असे अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप म्हणाले. विविध प्रश्नांवर बोलण्यासाठी असोशिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट इन रुरल एरिया या संघटनेकडून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ही पत्रकार परिषद अभिनव शिक्षण सोसायटी आंबेगाव येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघटनेचे प्रमुख रामदास झोळ यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थाचे कायदेशीर सल्लागार दिलीप जगताप उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जगताप यांनी असोशिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या. जगताप  म्हणाले, 'सीईटीशिवाय प्रवेश अथवा कॅप राउंड संपल्यावर समुपदेशक फेरीमध्ये सीईटी दिलेले विद्यार्थी संपल्यानंर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायला हवा. त्याचबरोबर, राज्यामध्ये इंजिनिअरिंग व फार्मसी या अभ्यासक्रमांची प्रवेश पात्रता सर्वोच्च शिखर संस्था व खासगी विद्यापीठांप्रमाणे करायला हवी. जेणेकरुन, महाराष्ट्रातील महाविद्यालयात जागा शिल्लक राहणार नाहीत. राज्यातील विद्यार्थी परराज्यात शिक्षणांसाठी जाणार नाहीत. तसेच, तंत्रशिक्षणाच्या अधिपत्याखआली येणाऱ्या अभ्यासक्रमास समुपदेशक फेरी घेण्यात यावी. या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन फेऱ्यात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश द्यावा. पहिल्या दोन फेरीत प्रवेश मिळून देखिल प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश देऊ नये. तसेच महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक कायदा सन २०१५ रद्द करण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

राज्यात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, गणित (पीसीएम ग्रुप) गटात सध्या खुल्या प्रवार्गासाठी ५० टक्के, तर राखीव प्रवर्गासाठी ४५ टक्के गुणांची अट आहे. तर औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी पीसीबी किंवा पीसीएम अशा गटात खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के तर राखीव प्रवर्गासाठी ४५ टक्के गुणांची अट आहे. ही अट शिथिल करण्याबाबत माजी कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सचिव सौरभ विजय यांच्यासोबत सकारात्मक बैठक होऊनही अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याची माहिती झोळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

BJP Candidate List : भाजप उमेदवारांच्या यादीला शुक्रवारचा मुहूर्त; शिवसेनेसोबत जागावाटप अजूनही अनिश्चित!

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

SCROLL FOR NEXT