चाकण, ता. ९ : येथील महात्मा फुले बाजारात नागपूरच्या हिरव्या मिरच्यांची आज (ता.९) सुमारे पंधरा टन एवढी आवक झाली. हिरव्या मिरचीला घाऊक बाजारात प्रति किलोस पन्नास रुपये भाव मिळाला. नागपूरच्या हिरव्या मिरचीची भाववाढ झाल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे येथील बाजारात नागपूरची हिरव्या मिरचीला चांगला बाजारभाव मिळत आहे.
किरकोळ बाजारात हिरवी मिरची मात्र ऐंशी ते शंभर रुपये किलोने विकली जात असल्याने त्याचा फटका सामान्य ग्राहकाला बसत आहे. बदलते हवामान, अवकाळी पाऊस यामुळे स्थानिक परिसरातील मिरचीचे पीक गेल्याने नागपूर, मध्यप्रदेश, कर्नाटक मधून हिरव्या मिरचीची आवक होत आहे. ही आवक मागणीनुसार वाढत असल्याचे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, व्यापारी रवींद्र बोराटे, गणेश झगडे, आबा गोरे व इतरांनी सांगितले. हिरव्या मिरचीला स्थानिक भाग, कोकण तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून मोठी मागणी आहे. किरकोळ विक्रेत्यांची मोठी मागणी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
......................
03141
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.