मांडवगण फराटा, ता.२९ : ‘‘केळी पिकासाठी तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तापमान, हवेचा वेग, वातावरणातील आर्द्रता, पाण्याचे प्रमाण, जमिनीतील पाण्याचे प्रमाण आदी बाबींची माहिती एआय तंत्रज्ञानातून मिळणार आहे,’’ असे मत नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी व्यक्त केले.
मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथे शुक्रवारी (ता.२५) केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी शाश्वत केळी उत्पादन व निर्यातक्षम लागवड तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. शिरूर तालुका कृषी विभागातर्फे याचे आयोजन केले होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, मंडल कृषी अधिकारी अनिल पाटील, कृषी पर्यवेक्षक कांतिलाल वीर, माजी सरपंच शिवाजी कदम, ग्रामपंचायत सदस्य सागर फराटे, भाऊसाहेब सोनवणे, विकास फराटे, कृषी सहाय्यक संतोष फलके, सागर पवार योगेश बोंगाणे, अश्विनी वंजारी, केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. जयवंत भगत यांनी सूत्रसंचालन केले.कांतिलाल वीर यांनी आभार व्यक्त केले.
02280
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.