आळंदी, ता. १८ : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरहून आळंदीकडे परतीच्या मार्गावर असताना सोहळ्यात सहभागी दिंड्यांच्या वारकऱ्यांना दोन वेळचे मोफत जेवण आळंदी देवस्थान देणार असल्याची माहिती विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी दिली.
याबाबत कबीर म्हणाले, ‘‘पंढरपूर परतीच्या मार्गावर पालखी सोहळा असताना देवस्थानच्या सोबत अनेक दिंड्यांतील वारकरी येतात. साधारण दोन हजार वारकरी परतीच्या मार्गावर चालत असतात. परतीचा प्रवास हा रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत असतो. यामुळे दोन हजार वारकऱ्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा बंदोबस्त यापूर्वी दिंडी चालक मालक करत असे. मात्र, सोहळ्यासोबत चालणारा दोन हजार लोकांना एकाच वेळी जेवणाची सोय व्हावी या दृष्टीने आळंदी देवस्थानच्या वतीने सोय करण्यात येणार आहे. विविध दानशूर भाविकांच्या मदतीने देवस्थान जेवण देणार आहे.
दरम्यान, आता पालखी सोहळ्यातही आळंदीकर विविध सेवा मोफत स्वरूपात देत आहेत. पालखीच्या रथासमोर मानाच्या बैल जोडीला लागणारे खाद्य पेंड, कडबा तसेच वाहतुकीसाठी लागणारा टेम्पो आळंदीग्रामकडून डिझेलसह मोफत स्वरूपात दिला जाईल. याचप्रमाणे वडगावकर कुटुंबीयांकडून दोन ट्रक आणि एक टेम्पोही मोफत स्वरूपात दिला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.