आळंदी, ता. २० : मावळ भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि आंद्रा, वडिवळे धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने आळंदीत (ता. खेड) इंद्रायणी नदीला पूर आला आहे. सतर्कतेचा इशारा देत नगर परिषद आणि पोलिसांनी इंद्रायणीवरील दोन पूल वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत. तसेच, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराजवळ पाणी पोहोचल्याने काही दुकाने बंद केली आहेत.
आळंदीत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. रस्त्यावर पाणीच पाणी आहे. त्यातच मावळ भागात पडत असलेल्या पावसामुळे इंद्रायणीला पूर आला आहे. मंगळवारपासून (ता. १९) भक्ती सोपान पुलावरून पाणी वाहत आहे. वडिवळे १९०० आणि आंद्रा धरणातून २७०० क्यूसेकने पाणी सोडले आहे. त्यामुळे इंद्रायणीवरील विविध भागातील घाटावर पाणी आले आहे.
इंद्रायणीवरील जुना दगडी पूल आणि बाह्यवळण मार्गांवर जाणारा पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर आल्याने अनेक नागरिक सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत आहेत. यामुळे पोलिस वारंवार सूचना करत आहेत. दरम्यान, इंद्रायणीनगर, गोपाळपुरा, सिद्धबेट या भागात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.