आळेफाटा, ता. ७ : ‘‘शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच सोयाबीनची पेरणी करावी,’’ असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव यांनी बोरी खुर्द या ठिकाणी केले.
विकसित कृषी संकल्प अभियान २०२५ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्यामार्फत खरीप हंगामाची पूर्वतयारी कार्यक्रम बोरी खुर्द (ता.जुन्नर)या ठिकाणी आयोजित केला होता. त्याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील ऋषिकेश कोकाटे, सुनीता बांगर, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षक निवड केलेले बाबाजी बांगर, प्रगतशील शेतकरी संपत चिंचवडे आणि महिला वर्ग उपस्थित होते.
यावेळी मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव यांनी खरीप हंगामाची पूर्वतयारी करताना शेतकऱ्यांनी चांगले बियाणे बीजे प्रक्रिया करूनच पेरणी करावी तसेच जमीन आरोग्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनी कोणतेही पीक घेण्याअगोदर माती परीक्षण करावे. सेंद्रिय खत, रासायनिक खते आणि जैविक खते यांचा योग्य प्रकारे वापर करावा, जेणेकरून जमिनीचेही आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल तसेच पीक संरक्षणामध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पिकाची फवारणी जर केली तर निश्चितच पीक संरक्षणामधील बाबींवरील खर्च कमी होऊन शेतकऱ्यांसाठी योग्य नियंत्रण कमी खर्चामध्ये होऊ शकते अशी माहिती दिली.
दरम्यान, यावेही शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रामार्फत सोयाबीन पिकाचे एक एकरसाठी बियाणे तसेच जैविक निविष्ठांचे वाटप करण्यात आले.
06485
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.