पारगाव, ता.१६ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतातील भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाली आहे काही शेतकरी भरपावसात भिजत विक्रीला आलेला भाजी पाला काढून तो सुकवून विक्रीसाठी नेत आहे. यात शेतकऱ्यांचे हाल होत आहे.
तालुक्याच्या पूर्वभागात तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतातील भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून चिखल झाला आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. बाजारात कोथिंबीर च्या शंभर जुडीला २००० ते ३५०० रुपये तर मेथीच्या १०० जुडीला २००० ते ४५०० रुपये व शेपूच्या १०० जुडीला ५०० ते १५०० रुपये बाजारभाव मिळत आहे असे गावडेवाडी येथील भाजीपाल्याचे व्यापारी गणेश गावडे व पोंदेवाडी येथील भाजीपाल्याचे व्यापारी सुशांत रोडे यांनी सांगितले.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला काढणीला आला आहे ते शेतकरी रेनकोट घालून भर पावसात भिजत चिखलात भाजीपाल्याची काढणी करत आहे टाव्हरेवाडी येथील बाप्पू टाव्हरे यांनी भरपावसात त्यांच्या शेतातील कोथिंबिरीची काढणी केली आहे. अवसरी बुद्रुक येथील खालचा शिवार मळ्यातील नारायण जाधव व मनीष चव्हाण या शेतकऱ्यांनी शेतात डोक्यावर प्लॅस्टिक कागद धरून कोथिंबीर काढली. काढलेली कोथिंबीर पुन्हा सुकवून विक्रीला न्यावी लागत आहे.
06104
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.