भुकूम, ता. १२ : मुळशी तालुक्यातील पश्चिम भागात भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यात शेतमजुरांची टंचाई व असलेले मजूर पुरेसे काम करत नसल्यामुळे शेतकरी कोकणात मजूर आणून भात लावणी करून घेत आहेत.
तालुक्याच्या पश्चिम भागात भात रोपे लावणी योग्य झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कामे सुरू केली आहेत. तालुक्यात मुठा खोरे येथे लव्हार्डे, आंदगाव, माळेगाव तसेच आंबडवेट, रिहे परिसरात आदिवासी, कातकरी मजूर आहेत. त्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे अनेक शेतकरी दरवर्षी कोकणातून मजूर आणून भात लावणी करतात. कोकणातील माणगाव, निजामपूर, विळे, महाड या भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी शेतमजूर मिळतात. भात लावणी होईपर्यंत त्यांना मुळशीत ठेवले जाते. सध्या अडीचशे शेत मजूर आणले आहेत. ते सकाळी सात वाजता कामास सुरुवात करून व संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चांगले काम करतात. त्यांचे राहणे, तीन वेळा जेवण व इतर सोय करावी लागते. भात लावणीच्या काळात शेतमजुरांचा दर चारशे वरून पाचशे रुपयेपर्यंत गेला आहे.
02582
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.