भोर, ता. २५ : तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतातील भुईमूग व आंबा पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या भाताच्या रोपांची धूळवाफेवरील पेरणीही अद्याप झालेली नाही. आणि ज्या शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली त्यांचे बियाणे वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे.
तालुक्यात गेल्या १० दिवसांत १६० मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. पावसामुळे शेतातील काढणीला आलेला भुईमूगाच्या शेंगदानेला कोंब फुटले आहेत. काही ठिकाणी भुईमूगाच्या शेंगातून दाणे उगवले आहेत. त्यामुळे शेतकरी भर पावसातच भुईमूग काढू लागले आहेत. याशिवाय आंब्यांचे व भाजीपाल्यांचेही नुकसान झाले आहे. यामध्ये बाजरी, काकडी, भेंडी, टोमॅटो, मिरची, भेंडी व इतर भाजीपाल्यांचा समावेश आहे. भाताच्या शेतीसाठी मशागत करून ठेवलेली भातखाचरे व शेतीमध्ये पाणी साठले आहे. शेतातील पाणी जाण्यासाठी शेतात चर मारले असले तरीही पावसाची संततधार सुरू असल्याने शेतातील पाणी जसेच्या तसेच आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
भुईमूग काढणीला आला होता. पावसामुळे शेतात पाणी झाले आणि भुईमूगच्या शेगांना कोंब फुटले आहेत. त्यामुळे भर पावसातही आम्ही नाईलाजाने भुईमूगाची काढणी करण्यास सुरुवात केली आहे. मायबाप सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
- समाधान चौधरी, शेतकरी शिरवली तर्फे भोर.
05342
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.