पुणे

चासकमान धरणातून अखेर आवर्तन बंद

CD

चास, ता. १७ : चासकमान (ता. खेड) धरणातून १४ डिसेंबर रोजी कालव्याद्वारे सोडण्यात आलेले आवर्तन शनिवारी (ता. १७) सकाळी दहा वाजता बंद केल्याची माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता एस. एस. सुसुंद्रे यांनी दिली. धरणात केवळ ६.६७ टक्के (०.६७ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय धरणातून पाणी सोडता येणार नाही.
खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान धरणातील पाणीसाठा झपाट्याने मृत साठ्याकडे झेपावत आहे. चालू वर्षी धरणातून सर्वप्रथम १४ डिसेंबर रोजी रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले. त्याला लागूनच उन्हाळी हंगामाचे आवर्तन सोडल्याने गेली १५४ दिवसांपासून कालव्याद्वारे आवर्तन अव्यवहातपणे सुरू होते. धरणातून सोडण्यात येत असलेल्या आवर्तनामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई सुरू झाली होती. या शिवाय पावसाचे आगमन लांबल्यास पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला पाणीसाठा शिल्लक राहणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
याबाबत ‘सकाळ’ने आवर्तनाबाबत व पिण्याच्या पाण्याचा साठा राखीव ठेवण्याबाबत १४ एप्रिल २०२५ रोजी धरण प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले होते की, धरणातील मृतसाठा एक टीएमसी असून, तो शिल्लक ठेवून उपयुक्त पाणीसाठ्यातून १८ एमएमक्यूब म्हणजेच आठ ते नऊ टक्के पाणीसाठा पिण्याच्या पिण्यासाठी राखून ठेवला जाईल. त्यानुसार शनिवारी (ता. १७) धरणातील पाणीसाठा ६.६७ टक्के शिल्लक असताना कालव्यातून सोडण्यात येत असलेले आवर्तन बंद केले आहे. आता धरणातून कालव्याद्वारे वा नदीपात्रात पाणी सोडणे अशक्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय पाणी सोडता येणार नसल्याचे धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

चासकमान धरणातील पाणीसाठा
आजअखेरचा एकूण पाणीसाठा : १.६३ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा- ०.६७ टीएमसी
टक्केवारी- ६.६७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT