चास, ता.२५ : गेली सतरा दिवसांपासून पाऊस कोसळत बळिराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. उन्हाळी हंगामातील पिके पूर्णपणे हातातून गेली आहेत. खरिपाच्या पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीच झालेल्या नसल्याने खरिपाच्या पेरण्या कशा करायच्या असा अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.
खेड तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसाने उन्हाळी हंगामातील पिकांची पूर्णपणे वाताहत केली असून पिकांची वाढ खुंटली आहे. पिकात पाणी साचून रहात असल्याने पिके पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे. चारा पिकांचीही तीच अवस्था आहे. उन्हाळी बाजरीची पिके सर्वत्र कापणीसाठी आलेली असतानाच गेली सतरा दिवसांपसून होत असलेल्या पावसामुळे कापणी होत नसल्याने बाजरीची कणसे काळी पडू लागली आहे. उभ्या बाजरीच्या कणसातून पुन्हा बाजरी उगवू लागली आहे. आता पाऊस थांबला तरी बाजरी पिकापासून कोणतेही उत्पन्न मिळणार नाही कारण पावसाने काळी पडलेली बाजरी खाताना कडू लागणार असल्याने कमान येथील शांताराम नाईकरे, गणपत नाईकरे यांनी शेतात तयार असलेले बाजरीचे पीक कापून कणसे शेतातच फेकून दिली आहे.
नुकसान भरपाई देण्याची मागणी
बहुतांशी शेतकऱ्यांनी पावसामुळे बाजरीची ताटे जनावरासाठी चारा म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे काढलेला कांदा शेतातच सडून गेला आहे. धना व मेथी पीक हातचे गेले आहे. तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
03420
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.