चास, ता. २१ : भाताचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवड करण्यासाठी भाताची पेरणी केलेली
भातरोपे तरारली आहेत. लवकर झालेल्या पावसामुळे भातरोपे लागवडीसाठीही वेळेवर येणार असलातरी सततच्या पावसाने चास परिसरात भातरोपांची मुळे कुजण्याचा धोका असून शेतकरी पावसाच्या विश्रांतीच्या प्रतीक्षेत आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्टयात जवळपास ३२०० ते ३३०० हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते. गेली काही वर्षापासून पावसाचे कमी होत असलेले प्रमाण व त्या मुळे भाताच्या उत्पन्नावर होत असलेला विपरीत परिणाम यामुळे चिंतित असायचा मात्र चालू वर्षी मात्र वरुणराजाने कृपादृष्टी दाखवत वेळेच्या आधीच दमदारपणे आगमन करीत समाधानी व आनंदित केले होते.
खेडच्या पश्चिम पट्ट्यात खरीप हंगामात भाताचे पीक हे मुख्य असल्याने भाताची लागवड करण्यासाठी तयार होत असलेली रोपे निरोगी व जोमदार होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. वेळेवर पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरलेली भाताची भातरोपे जोमदार आहेत. मात्र, सततच्या पावसाने भातरोपांमध्ये पाणी साचलेले असून पाऊस असाच सुरू राहिल्यास रोपांची मुळे कुजण्याचा धोका आहे. काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यास भात लागवडपूर्व कामांना वेळ मिळणार असून रखडलेल्या पेरण्यांनाही सुरुवात होवू शकेल.
03509
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.