चास, ता. ११ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर ओसरला असून, चासकमान धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणातून भीमा नदीच्या पात्रात दरवाजावाटे होणारा विसर्ग थांबवण्यात आला आहे. धरणाचे उघडलेले तीनही दरवाजे बंद केले आहेत. सद्यःस्थितीत धरणात ७९.७६ टक्के (७ टीएमसी) पाणीसाठा झाल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात चालू वर्षी जुलै महिन्याच्या सुरवातीलाच मोठी वाढ होऊन धरणातील पाणीसाठा ८१ टक्के झाली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ७ जुलै रोजी धरणाचे पाचपैकी तीन दरवाजे उघडून १८०० क्यूसेकने विसर्ग भीमा नदीच्या पात्रात करण्यात येत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबला असून, ऊन पडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे धरणात येणारी आवक कमी झाल्याने धरणाचे उघडलेले तीनही दरवाजे बंद केले. धरणात सद्यःस्थितीत ७९.७६ टक्के पाणीसाठा असून, धरणातील कालव्याद्वारे वीज निर्मितीनंतर भीमा नदीच्या पात्रात ४०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण परिसरात एक जूनपासून ४२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.