पुणे

केळीच्या घडाला दहाच फण्या ठेवा

CD

खोडद, ता.२३ : ‘‘फ्रुटकेअर करताना विशेष काळजी घेणे आवश्यकता आहे. घडाला आठ ते दहाच फण्या ठेवाव्यात. केळी पिकाचे व्यवस्थापन व नियोजन उत्तम केले तर नक्कीच ३० ते ४० किलो वजनाचे घड येतील. तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्न वाढेल ’’ असे मत पोलन ॲग्रो मिनरल्सचे संचालक सागर कोपर्डीकर यांनी व्यक्त केले.
मांजरवाडी (ता.जुन्नर) येथे शनिवारी (ता.२१) केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन केले होते. कॅटव्हिला फार्मर प्रोडूसर कंपनी व श्री ॲग्रो ऑरगॅनिक यांच्यावतीने केळी उत्पादकांसाठी चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी कोपर्डीकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

केळी पिकांचे निर्यातक्षम उत्पादन व समस्या रोगांचे निवारण, केळी पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन, उत्पादन वाढ, नवीन लागवड, बाजार पेठेतील संधी, निर्यातक्षम केळी उत्पादन कसे घ्यावे, केळीसाठी कोणत्या प्रकारची जमीन असावी, रोपे कोणती असावी, फ्रुटकेअरचे महत्त्व याविषयी तांत्रिक बाबींविषयी कोपर्डीकर यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.

या चर्चासत्रासाठी जुन्नर, आंबेगाव, खेड शिरूर या तालुक्यांमधून केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ भरत टेमकर, डॉ.दत्तात्रेय गावडे यांनी एआय तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद केले.
यावेळी ज्ञानेश्वर ग्रेप ग्रोवर संस्थेचे सचिव शशिकांत थोरात, श्याम भोर, कॅटव्हिला फार्मर प्रोडूसरचे संचालक विनायक मुळे, दीपेश मुळे, अनिल नेहरकर, संतोष गांडूळ, गणेश यादव, सतीश वाघ, मनीष मोरडे, अमित खंडागळे, विजय थोरात, बाळासाहेब मुळे, डेक्कन व्हॅलीचे अजय बेल्हेकर, रवींद्र थोरात, सुनील वामन, महेंद्र भोर उपस्थित होते.

01437

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT