पुणे

समानीकरणाच्या जागांवरही शिक्षकांची बदली

CD

खोडद, ता. १९ : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची बदली यंदा उशिरा सुरू झाली आहे. प्रत्येक तालुक्यात समानीकरणासाठी ठेवलेल्या शाळांमध्येही ही प्रक्रिया सुरू असल्याने अनेक शिक्षक या प्रक्रियेत गुंतले असून, पुढील अनेक शिक्षकांवर अतिरिक्त राहण्याची वेळ आली आहे. याचा एकंदरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणार असल्याने पालक चिंता व्यक्त करत आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांची बदलीप्रक्रिया राबविताना समानीकरणाबाबत निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील अपेक्षित ठेवायच्या शिक्षकांच्या रिक्त जागांचे तालुकानिहाय आणि शाळानिहाय समप्रमाण निश्‍चित करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील काही शाळांवरील पदे ही समानीकरणासाठी रिक्त ठेवली जातात. या बदल्यांमध्येही त्या शाळा निश्‍चित केल्या होत्या, मात्र त्याच शाळांवर बदली पोर्टलने शिक्षक टाकल्याने समानीकरण असूनही त्या शाळांवरील रिक्त पदे कशी भरली, हा प्रश्‍न शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिक्षकांची बदलीप्रक्रिया पार पडताना समानीकरण हा एक महत्त्वाचा आहे. यात जिल्ह्यातील अनिवार्य ठेवायच्या रिक्त जागांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी निश्‍चित करतात. या वर्षी मोठ्या आणि लहान पटाच्या शाळा समानीकरणासाठी ठेवल्या होत्या. बदल्यांमध्ये समानीकरण यादी जाहीर झाली, मात्र बदल्यांमध्ये रिक्त ठेवायच्या शाळांवर शिक्षक टाकले गेल्याने पुढील शिक्षक अतिरिक्त होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
समानीकरणाची पदे ही भरती किंवा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी खुली करावीत, तसेच शिक्षकांच्या बदल्या करताना समानीकरणाअंतर्गत रिक्त ठेवाव्या लागणाऱ्या जागांवर बदलीने कदापि नियुक्ती दिली जाणार नाही, असा स्पष्ट शासन निर्णय असतानाही काही शाळांवर बदली पोर्टलने शिक्षक टाकल्याने पुढील शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली असून, ते शिक्षक समायोजनाच्या फेऱ्यात निष्कारण अडकले जाण्याची शक्यता आहे.
जुन्नर तालुक्यातील खोडद, पाटे खैरे मळा, बेल्हे या शाळांवर एक पद अनिवार्य रिक्त ठेवलेले असतानाही या शाळांवर बदलीप्रक्रियेत शिक्षक टाकल्याने समानीकरणासाठी प्रशासनाने ठेवलेल्या शाळांमधील एक पद बंद करताना बदली पोर्टल फेल ठरल्याचे दिसते.

समानीकरण म्हणजे काय?
बदलीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय समप्रमाणात निश्‍चित करणे आणि काही शाळा समान ठेवणे म्हणजेच समानीकरण होय.

सध्याची बदलीप्रक्रिया ही शिक्षणाची घडी विस्कळित करणारी आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, आता होणाऱ्या बदल्या शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या ठरत आहेत. शिक्षकांमध्ये ‘बदली हवी’ आणि ‘बदली नको’, असे दोन विचारप्रवाह पाहायला मिळत आहेत. पण हा काळ बदल्यांचा मुळीच नाही. बदल्या हा प्रशासकीय भाग नक्की आहे, पण त्याची वेळ निश्‍चित असावी. सध्या ही प्रक्रिया थांबवून त्या बदल्या मार्चमध्ये कराव्यात.
- जालिंदर डोंगरे, अध्यक्ष, श्यामची आई सेवा समिती, खोडद

बदलीप्रक्रियेमुळे शिक्षकांनी पुढील शैक्षणिक वर्षासाठी केलेले नियोजन वाया जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणार आहे. सध्या ही बदलीप्रक्रिया शासनाने थांबवावी आणि पुढील वर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी या बदल्या कराव्यात.
- आरती भोर, पालक, हिवरे तर्फे नारायणगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Video : शेतकरी दररोज जीवन संपवतोय अन् कृषीमंत्री विधिमंडळात रमी खेळताहेत; रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट

'स्लीपिंग प्रिन्स' अल-वलीद बिन खालेद यांचं निधन; सौदी अरेबियातील राजघराण्यावर शोककळा, 20 वर्षे होते कोमात, असं काय घडलं त्यांच्याबाबतीत?

Latest Maharashtra News Updates : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठकीसाठी टीडीपी खासदार लवू श्री कृष्णा देवरायलू पोहोचले

Nanded News: नांदेडमध्ये साडेतीन एकरांवर ‘किन्नर भवन’; निवास व्यवस्था, स्मशानभूमीसह मिळणार अन्य सुविधा

Video: हत्तीच्या बाळाची टरबूज मागण्याची क्यूट अदा, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मने

SCROLL FOR NEXT