पुणे

‘तंत्रज्ञानाद्वारे परवडणारी शेती करा’

CD

दौंड, ता. २ : ‘‘दिवसेंदिवस शेतीमध्ये विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान येत आहे ते शेतकरी बांधवांनी आत्मसात करावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती ही परवडणारी करावी,’’ असे आवाहन दौंड तालुक्यातील शेतकरी सल्ला समितीचे अध्यक्ष अरुण भागवत यांनी केले आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दौंड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात पार पडलेल्या कृषी दिनानिमित्त बोलताना अरुण भागवत यांनी हे आवाहन केले. यावेळी उत्‍कृष्ट कृषी अधिकारी, पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला
दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरुण मरभळ, तालुका कृषी अधिकारी राहुल माने, पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. यशवंत खताळ आदी उपस्थित होते. राहुल माने यांनी प्रास्ताविकामध्ये तालुक्यातील पडलेल्या पावसानुसार करावयाच्या उपाययोजना तसेच कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली.

महेश रुपनवर, सहाय्यक कृषी अधिकारी अंगद शिंदे आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सुप्रिया झरकर व सूरज बाबर यांनी सूत्रसंचालन तर प्रकाश लोणकर यांनी आभार मानले.

कृषी अधिकारी व शेतकऱ्यांना सन्मान
उत्कृष्ट काम केल्याबद्दल दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल माने, मंडल कृषी अधिकारी दिनेश फडतरे, उपकृषी अधिकारी दत्तात्रेय माने व राजू पवार, सहायक कृषी अधिकारी भारती उदमले, सचिन लोणकर, सुप्रिया झरकर, मच्छिंद्र कुदळे व बाबू गिरी यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर खरीप हंगाम २०२४ बाजरी व मका पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले.


03926

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT