घोडेगाव, ता. ३० : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मुसळधार पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवेदनाद्वारे जुन्नर- आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे केली आहे. दुष्काळ जाहीर केला नाही तर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी पश्चिम आदिवासी भागातील भातशेतीची आगार समजली जातात. यंदा भात पेरणी करण्यापूर्वीच दोन आठवडे अगोदर वळवाच्या मुसळधार पावसाने सुरुवात केली. भात लागवडी नंतरही दीड दोन महिने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पाण्याच्या माऱ्यामुळे भात रोपांची वाढ खुंटली आहे. तर भात रोपांची पाती पिवळी पडू लागली आहेत. यामुळे भविष्यकाळामध्ये भात पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार असून, आदिवासी बांधवांच्या उपजीविकेचा प्रश्न उभा राहणार आहे. यामुळे आदिवासी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
यावेळी माजी समाज कल्याण सभापती सुभाषराव मोरमारे, पंचायत समिती माजी सभापती संजय गवारी, कार्याध्यक्ष प्रकाश घोलप, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सीताराम लोहोट, मधू अप्पा बोऱ्हाडे, शैला आंबवणे, मंगल केदारी, नीलेश बोऱ्हाडे, व परिसरातील आदिवासी बांधव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.