घोडेगाव, ता. ७ : मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प वन हद्दीमध्ये डोंगर माथ्यावरती राबवावा, अशी मागणी आंबेगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन केली. सदर प्रकल्प हा उपयुक्त आणि फायदेशीर जरी असला, तरी तो गावठाण किंवा गायरान हद्दीमध्ये राबवू नये, अशी मागणी या निवेदनात केल्याची माहिती काँग्रेसचे नेते अशोक काळे पाटील यांनी दिली.
डिंभे धरणामुळे विस्थापित झालेल्या गावांचे तालुक्यातच पुनर्वसन केले असून, संबंधित गावामध्ये गायरान किंवा गावठाण हे अगदी छोटीशी आहे. त्याचप्रमाणे घोड नदीच्या पुराचा नदीकडेच्या अनेक गावांना धोका पोहोचत आहे. हा प्रकल्प गावाजवळ राबविल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम भविष्यात मानवी वस्तीवरती होऊ शकतात. तसेच, गावच्या विकासाला मर्यादा येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प भौगोलिक परिस्थिती पाहून शासकीय जमिनीवर राबवावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे. याप्रसंगी काँग्रेसचे नेते अशोक काळे पाटील, तालुका किसन काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब इंदोरे, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे सचिव राजाभाऊ भेंडे, नामदेव पोखरकर आजी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.