इंदापूर, ता.१३ : ‘‘बदलते हवामान आणि मागणीच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष शेतीत अद्ययावत तंत्रज्ञान वापरावे व फायद्याची शेती करण्याची करावी,’’ असे आवाहन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. अजय उपाध्याय यांनी बागायतदारांनी केले आहे.
इंदापूर येथे शुक्रवार (ता.१२) राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे, महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र, इंदापूर व फ्रेष्टा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, इंदापूर यांचे संयुक्त विद्यमाने रोजी द्राक्ष फळ छाटणी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. उपाध्याय पुढे म्हणाले की, बागायतदाराने त्याच्याजवळ असणाऱ्या संसाधनांचा काटेकोर वापर द्राक्ष शेतीमध्ये करण्याची आवश्यकता आहे. एकात्मिक अन्नद्रव्याचा वापर करून बोद वापसा अवस्थेमध्ये ठेवल्यास जागतिक दर्जाचे द्राक्ष उत्पादन करणे शक्य होईल.
यावेळी द्राक्ष संशोधन केंद्राचे फळ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत निकुंभे व महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे राजेंद्र वाघमोडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
चर्चासत्रास बारामती, इंदापूर, माढा, माळशिरस भागातील शेतकरी उपस्थित होते. सुधीर वाघमोडे यांनी प्रास्ताविक तर मनोज मोरे यांनी आभार मानले.
06256
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.