पुणे

कोळवण खोऱ्यात भात रोपवाटिकांचे पंचनामे

CD

कोळवण, ता. ५ : कोळवण खोऱ्यातील अतिवृष्टीमुळे भात रोपवाटिका नष्ट झाल्या होत्या. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना दिले होते. त्यानुसार मुळशी तालुक्यातील पंचनामे करण्यास मागील एक जुलैपासून सुरू झाले आहेत.

पंचनामे कृषी सहायक, ग्राममहसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांच्या संयुक्त पाहणी पथकाकडून प्रत्येक गावात जाऊन नुकसान झालेल्या भात रोपांचे पंचनामे केले जात आहेत. भात रोपवाटिकांचे पंचनामे करून तसा अहवाल तहसीलदार यांना सादर केला जाणार असून त्यानंतर मग पुढे जिल्हाधिकारी यांचे कडून याचे अवलोकन केले जाणार असून त्यानंतर शेतकऱ्यांना शासकीय निकषाप्रमाणे भात रोपांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. दरम्यान, चिखलगाव येथील नुकसानग्रस्त भात रोपवाटिकांची पाहणी करताना ग्राममहसूल अधिकारी प्रशांत कांबळे सरपंच किरण फाले पोलिस पाटील किसन फाले माजी सरपंच लहू फाले, राम फाले, अंकुश फाले, नीलेश फाले, रमेश फाले रूपेश फाले, तुषार फाले, तुषार जोशी दीपक फाले अतुल फाले उपस्थित होते

दरम्यान, पंचनामे करण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. ती तारीख दहा जुलैपर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. काही शेतकरी पंढरपूर येथील पायी वारीत सहभागी होण्यासाठी चालत गेले आहेत. ते परत सात ते आठ जूलै रोजी येणार आहेत ते शेतकरी पंचनामा करण्यापासून वंचित राहू नयेत.


भात रोपवाटिका पंचनामे आदेशानुसार क्षेत्रीय स्तरावर चालू आहे. नुकसान झालेल्या भात रोपवाटिकांचे क्षेत्र हे ५० टक्के पेक्षा जास्त असल्यास क्षेत्र भाताची पुनर्लागवड होणारे क्षेत्र शासन निर्णय २००२ च्या नुसार नुकसानीचे क्षेत्र म्हणून गृहित धरले जाणार आहे.
- हनुमंत खाडे, तालुका कृषी अधिकारी, मुळशी
02230

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

Ashadhi Wari 2025: विठूनामाने ‘प्रवरा संकुल’चे मैदान दुमदुमले; अश्‍वरिंगण सोहळा उत्साहात, १५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Raju Shetti: शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे नको: राजू शेट्टी; 'शक्तिपीठ'मुळे ५५ हजार शेतकरी देशोधडीला लागणार

SCROLL FOR NEXT