काटेवाडी, ता. १८ : ‘‘माझ्या कुटुंबातील अनेक जण छत्रपती कारखान्याचे सभासद आहेत. बारामती इंदापूर तालुक्यातील ५३ गावांच्या दृष्टीने हा कारखाना अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मी लक्ष घातले. कोणतीही निवडणूक आम्ही एकतर्फी मानत नाही. ही निवडणूक तुल्यबळच आहे असे समजून आम्ही लढत आहोत,’’ असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी (ता. १८) मतदान झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या मातोश्री आशाकाकी यांनी खताळपट्टा व भवानीनगर येथे मतदान केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे हर्षवर्धन पाटील देखील उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले की, पृथ्वीराज जाचक व जय भवानी माता पॅनेल यांच्यामध्ये कारखाना व्यवस्थित चालवण्याची धमक आहे. त्यांना सर्वांनी मतदान करावे. हवामान विभागाने १२ ते १३ जिल्ह्यांमध्ये राज्यात हाय अलर्ट दिला आहे. उन्हाळी पिकांचे यामुळे नुकसान होत आहे. नुकतीच विभागीय आयुक्तांबरोबर मी खरीप हंगामा संदर्भात बैठक घेतली आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना या पावसामुळे जर काही नुकसान झाले असेल तर त्वरित नियमांतर्गत नुकसान भरपाई द्या अशा सूचना दिल्या गेल्या आहेत, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.
‘नरकातला स्वर्ग’बाबत काही बोलायचे नाही
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे नरकातला स्वर्ग या नावाचे नुकतेच पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकासंदर्भात माध्यमाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडले असता. हे पुस्तक मी पाहिले नाही आणि वाचले देखील नाही. या संदर्भात मला काही बोलायचे नाही, अशी त्रोटक प्रतिक्रिया व्यक्त केली.
00895
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.