काटेवाडी, ता. ५ : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजारात गुरुवारी (ता. ५) विविध फळे, भाजीपाला आणि पालेभाज्यांचा लिलाव पार पडला. अतिवृष्टीमुळे अनेक तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे बाजारातील आवक कमी झाली आहे. एकूण ९३१.५० क्विंटल मालाची आवक नोंदवली गेली. यामध्ये बटाट्याची ५३० क्विंटल सर्वाधिक आवक झाली, तर पावट्याला सर्वाधिक सरासरी १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
जळोची उपबाजारात बटाट्याची सर्वात मोठी आवक झाली, तर लसणाची १०० क्विंटल आवक दुसऱ्या क्रमांकावर राहिली. पावट्याला १० हजार रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. अतिवृष्टीमुळे काकडी, गाजर, टोमॅटो यासारख्या पिकांचे नुकसान झाल्याने त्यांची आवक मर्यादित राहिली. तरीही, दर्जेदार मालाला चांगले दर मिळाले आहेत. जवळची उपबाजारामध्ये बारामती, दौंड, इंदापूर, माळशिरस, फलटण आणि भागातून तरकारी मालाची आवक होत असते. मात्र अतिवृष्टीमुळे येथील तरकारी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी आवक घटली आहे असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावात गुळाच्या बाजारात स्थिरता दिसली. गुळ/खडे (१४ क्विंटल) चे भाव किमान ४,०००, कमाल ४,२००, सरासरी ४,२०० रुपये प्रति क्विंटल, तर गूळ/बॉक्स (६८ क्विंटल) साठी किमान ३,८००, कमाल ४,५००, सरासरी ४,४०० रुपये प्रति क्विंटल नोंदले गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.