काटेवाडी, ता. १२ : महाराष्ट्र शासनाने अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत राज्यातील १०.३६ लाख शेतकऱ्यांची नोंदणी आणि फार्मर आयडी तयार करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ही नोंदणी जुलै २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना महाडीबीटी, पीक विमा आणि इतर कृषी योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येऊ नयेत. यापूर्वी मे २०२५ पर्यंत हे लक्ष्य पूर्ण करण्याचे नियोजन होते, परंतु नोंदणीची टक्केवारी कमी असल्याने आता ही मोहीम तातडीने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कृषी आयुक्तालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, तहसीलदार आणि तलाठी स्तरावर नोंदणी प्रक्रिया प्रलंबित आहे. राज्य शासनाने फार्मर आयडी अनिवार्य केल्याने ही प्रक्रिया गतिमान करणे आवश्यक आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय प्रकल्प अंमलबजावणी समितीमार्फत तातडीने कार्यवाही करून नोंदणी पूर्ण करण्यास सांगितले आहे. याबाबतचा अहवाल कृषी आयुक्तालयात पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.