खुटबाव, ता. २८ : दौंड तालुक्यामध्ये गेली १५ दिवस पाऊस पडल्याने दैनंदिन व्यवहार सर्व ठप्प झाले आहेत. यामुळे शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे. जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसामुळे मे महिन्यातच शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात येत आहे.
एकेरीवाडी (ता. दौंड) येथील माटोबा तलावाच्या कालव्याचे पाणी कालव्या शेजारील नागरिकांच्या घरामध्ये गेले. या कालव्याचे पाणी स्वप्नील महानोर, मोहन महानोर नीलेश महानोर या नागरिकांच्या घरामध्ये गेले. तसेच ग्रामस्थ तुकाराम टुले यांच्या एक लाख रुपये किमतीच्या मेथी व कोथिंबीर पिकांचे नुकसान झाले आहे. देलवडी येथील सचिन पारख यांच्या चार एकर कोथिंबिरीचे नुकसान झाले आहे. वृषभ शेलार यांची एक एकर कोथींबीर पाण्याखाली आहे. भुजंगराव शेलार यांचा शेतीचा भराव पाण्याने वाहून गेला आहे. काका कुतवळ त्यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी आले होते. दीपक शेलार यांच्या भेंडीच्या पिकाचे नुकसान झाले आहे .तर पोपटराव लव्हटे (पाच एकर) व सागर वांझरे (तीन एकर) ऊस लागवड गुडघाभर पाण्याखाली आहे. खुटबाव येथील संजय थोरात यांचे २० गुंठे भुईमूग पीक संपूर्ण पाण्याखाली गेले आहे.पिंपळगाव येथील पोपटराव जगताप यांच्या तीन एकर केळीच्या पिकामध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. पारगाव येथील नानासाहेब जेधे यांचा दोन एकर व बाळासाहेब काशिनाथ निकम अडीच एकर शेतात साठवलेला कांदा पाण्याखाली गेला आहे. यामुळे शेती पिकाचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ बबनराव शेलार यांनी केली आहे.
02471
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.