मंचर, ता. ३१ : येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात ‘अण्णासाहेब आवटे राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धे’चे आयोजन शुक्रवारी (ता. ३) करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला व अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी विविध समकालीन विषयांवर ही स्पर्धा होणार असल्याचे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी सांगितले.
स्पर्धा माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ अशा तीन गटांमध्ये होणार आहे. गटाचे नाव व विषय - माध्यमिक गट - पुस्तक वाचनाचे महत्त्व, स्वच्छ भारत माझी जबाबदारी, मानसिक आरोग्य आणि विद्यार्थी, पर्यावरण आणि नागरिकांची कर्तव्ये, डिजिटल युगातील ज्ञानक्रांती
कनिष्ठ गट - सध्याचे राजकारण, लोकशाहीचा उत्सव की कीड, भारताची एकता आणि अखंडता, कृत्रिम बुद्धिमत्ता - एक आव्हान, शाश्वत विकास आणि पर्यावरण, त्रिभाषा सूत्र : गरज की हानी
वरिष्ठ गट-शेतकरी आत्महत्या आणि युवकांची भूमिका, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) - भविष्यवेध : संधी की धोका, आरक्षणाचे धोरण - गरज की राजकारण, ‘लाईक, शेअर अॅण्ड सबस्क्राईब’ - आपण नेमके कुठे चाललो आहोत?
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी वक्तृत्व स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. पी. पी. इंजळकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.