माळशिरस, ता,४ : परिसरात (ता. पुरंदर )वीज कर्मचाऱ्यांनी संप केल्याने पूर्व भागातील सर्वसामान्य नागरिकांची , शेतकऱ्यांची, दूध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. रात्री शेतीसाठी चालू असलेला विद्युत पुरवठा पहाटे बंद झाला. यामुळे शेतकऱ्यांना अडचण झाली.
राजुरी परिसरात दिवसा शेती करता होणारा विद्युत पुरवठा आज बंद होता, अनेक ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे जनावरांना पाणी,चारा कुट्टी करणे अवघड झाले, पोंढे येथे विद्युत पुरवठा लवकर सुरू होईल की नाही या भितीने पिण्याच्या पाण्याच्या फिल्टर प्लॅन्ट वर जादाचे पाणी भरून ठेवण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. नायगाव येथील प्रगतिशील शेतकरी व विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष संदीप खेसे यांनी सांगितले की, शासनाने आणलेले खाजगीकरण धोरणावर धोकादायक आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज वापरणे अवघड होईल व अगोदरच उत्पादन खर्च वाढल्याने तोट्यात चाललेली शेती शेतकऱ्यांना करणे अवघड होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.