नसरापूर, ता. २ : खोपी (ता.भोर) परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीतील प्रयोग तसेच कृषी विभागाच्या शासकीय योजनांविषयी माहिती देण्यात आली. कृषी दिनानिमित्त कृषी विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
खोपी येथे नवविकास युवक शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या वतीने उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती व शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात आली तसेच शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क जीवामृत गांडूळ खत तयार करणे या याविषयी प्रशिक्षण ‘आत्मा’चे लक्ष्मीकांत कणसे यांनी दिले व कृषी विभागाचे माधुरी दिघे यांनी शासकीय योजनेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
यावेळी नवविकास युवक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी हा जगाला वाचवण्यासाठी २४ तास कष्ट करत राहिला . हा पोशिंदा सध्या मोठ्या अडचणीत आहे उत्पादित शेतीमालाला योग्य भाव नाही तर कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी वाढत्या खतांच्या किमती अशा अनेक अडचणींना तोंड देत आहे. सरकार व्यावसायिकांना कर्ज माफी देते परंतु शेतकऱ्यांना फक्त आश्वासने दिली जात आहेत याचा आम्ही जाहीर निषेध करतो.
कार्यक्रमाला शेतकरी खोपीचे सरपंच तुषार कांबळे, कृष्णा शिवरकर, नारायण मोरे. दत्तात्रेय शिरावळे, कृष्णा मारणे, सुनील मारणे, तानाजी जगताप आदी प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
05523
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.