नीरा नरसिंहपूर, ता.४ : केळीचा बाजारभाव घसरल्याने मागील काही दिवसांत दोन ते तीन रुपये प्रतिकिलो एवढा कमी बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे पिंपरी बुद्रुक येथील उत्पादकांना केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरविण्याची वेळ आली.
व्यापारी सरकारची दिशाभूल करत शेतकऱ्यांच्या केळीचा बाजारभाव सात रुपये प्रतिकिलो असा दाखवत असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना तो मिळत नाही. शेतकऱ्यांच्या पदरी केवळ प्रतिकिलोस दोन ते तीन रुपये मिळत आहेत. केळीचे घड शेतामध्येच झाडाला पिकत असल्याचे विदारक चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
केळीला प्रतिकिलो १८ ते २६ रुपये ऑगस्ट महिन्यात भाव मिळत होता. तेच आत्ता दोन ते तीन रुपयापर्यंत खाली आले आहेत. विशेष म्हणजे चांगल्या प्रतिच्या मालाला देखील योग्य भाव मिळत नसल्याने व अवकाळी पावसामुळे शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या गर्तेत सापडला आहे. यावर सरकारचे मात्र अजिबात लक्ष नसल्याने शेतकऱ्यांना नाराजी पसरली आहे.
व्यापारी शेतकऱ्याकडून दोन ते तीन रुपये केळी खरेदी करून ग्राहकाला ३० ते ५० रुपये प्रतिडझन या चढ्या भावाने विक्री करत आहे. शासनाला या व्यापाऱ्यांकडे लक्ष द्यायला मात्र वेळ नाही. शेतकरी मात्र अतिवृष्टी, दर घसरण यांच्या गर्केत सापडला असल्याने शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.
05186
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.