फुलवडे, ता. ५ : तळेघर (ता. आंबेगाव) येथे यंदा झालेल्या दमदार पावसाने भात खाचरात पाणी साचल्याने चारसूत्री पद्धतीने भात लागवडींना सुरुवात झाली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील तळेघर, कुशिरे, भोईरवाडी, कोंढरे, माळीण, अडिवरे, बोरघर आदी परिसरात चारसूत्री भातलागवडींना सुरुवात झाली आहे. चारसूत्री पद्धतीने भात लागवड म्हणजे भात पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी वापरली जाणारी एक पद्धत आहे. यामध्ये जमिनीची मशागत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि पिकाचे व्यवस्थापन या चार प्रमुख गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाते.
दरम्यान, काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जमिनीत वापसा होताच. शेतकऱ्यांनी साळीच्या पेरण्या केल्या. त्यामुळे भातरोपे लागवडीसाठी तयार झाली आहेत. असे तळेघर येथील शेतकरी संतोष तिटकारे व बोरघर येथील शेतकरी शरद बांबळे यांनी सांगितले.
04163
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.