- १७ जानेवारी- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे पुणे- नाशिक महामार्गावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रवासी वाहतूक करणारी मोटार, रस्त्यात उभी असलेली नादुरुस्त एसटी बस व आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला होता. त्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील १८पैकी नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आठ जण जखमी झाले होते.
- १३ मे- खेड तालुक्यात मे महिन्यात अवकाळी पावसाने भीमा नदीला पूर आला होता.
- ७ जुलै- पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गास विरोध करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.
- ५ ऑगस्ट- जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथे आठ वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मुत्यू
- ११ ऑगस्ट- खेड तालुक्यातील पाईट गावाजवळील कुंडेश्वर देवाच्या दर्शनासाठी गेलेल्या भविकांच्या वाहनाला अपघात होऊन १२ महिला ठार, तर २९ भाविक जखमी झाले होते.
- १७ ऑगस्ट- शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील अष्टविनायक महामार्गावर काळूबाईनगर परिसरात बंटी ढाब्याजवळ झालेल्या भीषण अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील वडनेर (ता. पारनेर) येथील वाजे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
- २० आॅगस्ट- इंदापूर तालुक्यात नीर नदीला पूर
- २२ ऑगस्ट- वेल्हे तालुक्याचे राजगड तालुका नामकरणाचा अध्यादेश निघाला.
- १ सप्टेंबर, २२ सप्टेंबर व २ ऑक्टोबर- शिरूर तालुक्यातील पिंपरखेड व जांबूत येथे बिबट्यांच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू
- २८ सप्टेंबर- जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगे धरणामधून पहाटे ३.३० वाजता अचानक पुष्पावती नदी पाणी सोडल्याने नदीवरील मोटारी आणि नदीलगतच्या शेतीचे व शेतातील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गोठ्यात पाणी शिरल्याने एक गाय जागीच ठार झाली आहे. उदापूर येथील पुष्पावती नदीवरील छोटा पुल अर्धा तुटून वाहून गेला होता.
- २१ डिसेंबर- नगरपालिका निवडणुकांचा निकाल
- २८ डिसेंबर- बारामतीत देशभरातील तालुका पातळीवरील पहिले विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलेन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते झाले.