राहू, ता. ३ : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत, साहित्य उत्सव अंतर्गत राज्यस्तरीय खुली साहित्य लेखन स्पर्धा नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केली होती. राज्यस्तरीय स्पर्धेत लेखक आजिनाथ सासवडे यांना द्वितीय क्रमांक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
साहित्य राज्यस्तरीय स्पर्धा तीन दिवसात पार पडली. या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून लेखक, कवी, नाट्यछटाकार यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला होता. साहित्य उत्सवाच्या कथा लेखन स्पर्धेत आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर गावचे लेखक आजिनाथ सासवडे यांच्या ‘मेटे मामा’ या कथेसाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे होते.
सासवडे यांना यापूर्वी देखील अनेक राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे ‘सुखाचा शोध’ नावाचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे.
मला लेखन साहित्याची पहिल्यापासून आवड आहे. भविष्यात हेच लेखन साहित्य जपून नवनवीन लेखन करण्यासाठी मला या पुरस्कारामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्राप्त होत आहे.
- आजिनाथ सासवडे, लेखक
03720
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.