राजगुरुनगर, ता. १८ : राजगुरुनगर नगरपरिषेदीतील अनुसूचित जाती आरक्षण चक्राकार पद्धतीने पडले नसल्याचा दावा करत भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राजगुरुनगर ग्रामपंचायतीचे सन २०१४मध्ये नगरपरिषदेत रूपांतर झाले. त्यानंतर सन २०१५मध्ये निवडणूक झाली. त्यात आताच्या प्रभाग क्रमांक १०मध्ये अनुसूचित जाती महिलेचे आरक्षण होते. त्यानंतर होणारी ही दुसरी निवडणूक असल्याने अनुसूचित जातीसाठीचे आरक्षण चक्राकार पद्धतीने स्वाभाविकपणे दुसऱ्या क्रमांकाची अनुसूचित जातीची लोकसंख्या असलेल्या पुढच्या प्रभागात पडणे क्रमप्राप्त होते. मात्र, प्रशासनाने पुन्हा याच प्रभागात अनुसूचित जाती आरक्षण निश्चित केले. त्यामुळे इतर प्रभागातील अनुसूचित जाती प्रवर्गाच्या नागरिकांवर अन्याय होत आहे. तसेच, त्याच प्रभागातील अन्य प्रवर्गातील नागरिकांवर अन्याय होत आहे, म्हणून ही याचिका दाखल केली असल्याचे डोळस यांचे म्हणणे आहे.
तर, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नव्याने लागू करण्यात आलेल्या नियमावलीनुसार हे आरक्षण प्रशासनाकडून निश्चित झाले आहे. पुढच्या वेळी हे आरक्षण बदलेल, असे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.