पुणे

जिरायती शेती बागायत करण्याचे स्वप्न अधुरे

CD

शेटफळगढे, ता. ५ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधेसाठी दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक सिंचन विहिरीच्या अनुदानात सरकारने वाढ करावी. पाण्याअभावी बागायती शेती करण्याचे स्वप्न अपुरे राहत आहे. यामुळे विहीर खोदण्यासाठी कमाल पाच लाख रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे विहीर खोदता येत नाहीत. अशा शेतकऱ्यांना जिरायती शेती बागायत करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून सिंचनाच्या सुविधेसाठी वैयक्तिक स्वरूपाच्या विहिरी सरकारच्या वतीने दिल्या जात आहेत. यासाठी त्या शेतकऱ्याकडे किमान दीड ते कमाल पाच एकर शेत जमीन असणे आवश्यक असून, शेत जमिनीत विहीर पड किंवा बोअरवेल नसावे व त्या शेतकऱ्याचे मागील तीन वर्षाचे शेत जमिनीमधील पीक पाणी जिरायती असावे. अशी अट आहे. यापूर्वी २०१७ मध्ये तत्कालीन सरकारने विहिरीच्या अनुदानात दोन लाखांवरून वाढ करून या अनुदानाची कमाल मर्यादा तीन लाख रुपये केली होती. तर नुकत्याच सत्तेवर आलेल्या युतीच्या सरकारने या विहिरीसाठीचे अनुदान चार लाख रुपये केले आहे. मात्र, आता या निर्णयास जवळपास चार महिने झाली आहेत. परंतु वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना हे अनुदान अपुरे पडत आहे. मजुरांद्वारे विहीर खोदत असताना मजुरांना शेतकऱ्याला प्रति दिवसाला सहाशे रुपये द्यावे लागत आहेत.

खडी वाळू स्टील याच्या दरात वाढ
शेतकऱ्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मजुरीच्या दरात वाढ होणे गरजेचे आहे. याशिवाय शेतकऱ्यांना विहीर पूर्ण झाल्यावर सिमेंट काँक्रीटची रिंग टाकावी लागत आहे. सध्या खडी वाळू स्टील याच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे विहीर पूर्ण करण्यासाठी सध्या जवळपास पाच लाख रुपये लागत आहेत. ही रक्कम जवळ नसल्याने आपल्या विहिरीची कामे अपूर्ण ठेवावी लागत आहेत. त्यामुळे सरकारने वाढत्या महागाईचा विचार करून शेतकऱ्यांच्या हितासाठी विहिरीच्या अनुदानात वाढ करणे गरजेचे आहे.

रोहयोतून विहीर खोदण्यासाठी प्रतिदिवसाला २५६ रुपये दिले जातात. परंतु शेतकऱ्याला सध्या प्रति दिवसाला सुरू असलेल्या ६०० रुपयांच्या मजुरी दरात जवळचे ३४४ रुपये भरावे
लागत आहेत. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचे जिरायती शेती बागायत करण्याचे स्वप्न अपूर्ण राहत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी कमाल पाच लाख रुपये अनुदान देणे गरजेचे आहे.
-संतोष (काका) वाबळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर


28707

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT