शेटफळगढे, ता १६ : म्हसोबाचीवाडी (ता इंदापूर) येथे इंदापूरच्या कृषी अधिकाऱ्यांनी बाजरी पीक व्यवस्थापनाचे धडे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिले.
तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे यांनी खरीप हंगामातील बाजरी पिकाचे व्यवस्थापन करण्याबरोबरच देशी गोवंश पालन करण्याच्या माध्यमातून जीवामृत तयार करून त्याचे शेतीसाठी होणारे फायदे त्याचबरोबर चांगल्या दर्जाचे दूध उत्पादन हे कसे महत्त्वाचे आहे. हे पटवून देण्याचे काम केले. तसेच शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत महत्त्वाचे असते. त्यामुळे शेतीला जोड व्यवसाय म्हणून देशी गोवंश पालन केल्यास त्याचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला पूरक असलेला हा व्यवसाय देखील करणे गरजेचे आहे, असे गरगडे यांनी सांगितले.
यावेळी मंडलाधिकारी किरण पिसाळ, कृषी सहाय्यक सचिन मोरे, संतोष सरडे, सरपंच राजेंद्र राऊत, ग्रामसेवक सोनाली गवळी, शेतकरी नामदेव चांदगुडे, दत्तात्रेय चांदगुडे, यशवंत चांदगुडे, गोपाळ गोरे, महेश चांदगुडे, सुरेश चांदगुडे नारायण शिंदे, मनोज चांदगुडे इत्यादी उपस्थित होते.
01620
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.