टाकळी हाजी, ता ११ : ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’चे पुनसर्वेक्षण प्रक्रिया करून टाकळी हाजी (ता. शिरूर) शाखेमधील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंत क्षमतेचे कृषिपंप असलेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी मोफत वीज देण्याची तरतूद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक कृषिपंप ग्राहकांच्या वीज देयकांमध्ये प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा अधिक भार नोंद झाल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत.
पुनसर्वेक्षणानंतर प्रत्यक्ष क्षमतेनुसार वीजभार दुरुस्त झाल्यास, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने सुरू केलेली योजना सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. चुकीच्या वीजभारामुळे शेतकऱ्यांचा हक्काचा लाभ रोखला जाणे अन्यायकारक आहे, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
टाकळी हाजी परिसरात मोठ्या प्रमाणात जादा भार लागल्याने शेतकरी वंचित राहिलेले असून, विद्युत वितरण कंपनीने पुन्हा सर्वेक्षण करावे, अशी मागणी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.