उद्धट, ता. ३ ः पवारवाडी (ता. इंदापूर) येथील एका शेतकऱ्याने ओढ्याच्या कडेने जाणारा पाणंद रस्ता भरून टाकून अडविला आहे. त्यामुळे या ठिकाणाहून ये- जा करणाऱ्या शेतकऱ्यांची वाट बंद झाली आहे.
येथील शेतमालकाने पाणंद रस्ता मुरूम व माती टाकून अडवला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या शेतकऱ्यांना सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावरून वळसा घालून जावे लागत आहे. हा रस्ता यापूर्वी ओढ्याच्या पाण्याने तीन वेळा वाहून गेला आहे. यावर सर्व शेतकऱ्यांनी रस्ता करण्याचे ठरवले, परंतु शेतमालकाला ते मान्य नव्हते. या कारणाने मध्येच रस्त्याला मुरूम व माती टाकून, तसेच चार- खणून रस्ता बंद केला आहे
हा रस्ता बंद असल्याकारणाने सुमारे १०० एकरावरील शेतकऱ्यांना पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून आपली वाहने घेऊन जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांच्या उसाला तोड आली असून, रस्त्याअभावी ऊस वाहतूक करणे अवघड झाले आहे. तरी संबंधित विभागाने तातडीने यामध्ये लक्ष घालून रस्ता सुरू करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
00592
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.