वालचंदनगर, ता.२ : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये संचालक मंडळाने १२ लाख टन उस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याला अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी सभासदांनी सर्व ऊस गाळपासाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याला घालावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी केले आहे.
भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ चे ऊस लागवड धोरण निश्चित केले आहे. शेतकऱ्यांना एक जुलै २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत ऊस लागवड करता येणार आहे, अशी माहिती जाचक यांनी दिली.
कारखान्याने २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी ऊस लागवड धोरण निश्चित केले आहे. एक जुलै ते १५ जुलैपर्यंत को-एम. ०२६५ या जातीच्या उसाची लागवड करता येणार आहे. १६ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत को- ८६०३२ व पी.डी.एन.१५०१२ या जातीचा ऊस लावता येणार आहे. एक सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर पूर्व हंगामामध्ये व एक डिसेंबर २०२५ ते, ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या सुरू हंगामामध्ये को- ८६०३२, एम.एस.१०००१, पी.डी.एन.१५०१२, फुले १५००६, फुले १३००७ या जातीचा ऊस लावता येणार आहे. २०२५ - २६ गळीत हंगाम सुरू झाल्यापासून हंगाम संपेपर्यंत को- ८६०३२, एम.एस.१०००१, पी.डी.एन.१५०१२ व को- एम. ०२६५ या जातीचा खोडवे व निडवे ठेवण्याची परवानगी दिली आहे.
पट्टा पद्धतीने लागवड करण्याचे आवाहन
दिवसेंदिवस ऊस तोडणी मजुरांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर मात करण्यासाठी मशिनचे ऊस तोडणी करणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड करताना ४ व ५ फूट रुंद सरी काढून पट्टा पद्धतीने लागवड करावी. यामुळे एकरी उत्पादनामध्ये वाढ होणार असून कीड व रोग नियंत्रण करणे ही सोपे जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.